सुसंस्कृत राजकीय महाऋषी हरपला; पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा – आमदार लक्ष्मण जगताप

0
727

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – भारताच्या राजकारणातील कवी मनाचा अजातशत्रू व सुसंस्कृती राजकारणी असलेल्या अटलबिहारी वाजपेयी नावाच्या महापर्वाचा अस्त झाला आहे, अशा शब्दांत भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच व्यक्तीद्वेष न ठेवता देशाच्या विकासासाटी सर्वांना सोबत घेऊन शेवटपर्यंत मार्गक्रमण केलेल्या या महामेहरूच्या निधनाचा पिंपरी-चिंचवडकरांनी दुखवटा पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.