सुषमा स्वराज स्मार्ट नेत्या, म्हणूनच मैदानातून माघार – पी चिदंबरम्  

0
444

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या स्मार्ट नेत्या आहेत. मध्य प्रदेशात भाजपची स्थिती सध्या खराब आहे. त्यामुळेच स्वराज यांनी मैदानातून माघार घेतली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम् यांनी व्यक्त केली आहे. आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा सुषमा स्वराज यांनी मंगळवारी  केली आहे. यावर चिदंबरम् यांनी ट्विटरवरून टीका केली आहे.