Maharashtra

सुरेश पाटील म्हणजे भाजपने सोडलेले पिल्लू; मराठा समन्वकांचा घणाघात   

By PCB Author

October 30, 2018

नाशिक, दि. ३० (पीसीबी) – एकसंध मराठा समाजात फूट पडावी, म्हणूनच सुरेश पाटील मराठ्यांच्या नव्या पक्षाची स्थापन करत आहेत. यामागे भाजपचा कुटील डाव असून पाटील हे भाजपने सोडलेले पिल्लू आहे, अशी घणाघाती टीका नाशिकच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वकांनी केली आहे.      

याआधी मराठा समाज एकसंध ठेवण्यासाठी कोणीही पक्ष किंवा संघटना स्थापन  करू नये, असे ठरले होते. मात्र, पाटील यांच्या नव्या  पक्षाला नाशिकमध्ये प्रवेश नसेल, अशी ठाम भूमिका  समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

मराठा समाजाच्या असंतोषाला वाट करून देण्यासाठी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्षाची स्थापना करण्याची घोषणा इचलकरंजी येथील सुरेश पाटील यांनी  नाशिकमध्ये केली.  त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील  मराठा  मोर्चाच्या समन्वयकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करून नव्या पक्षाला कडाडून विरोध केला आहे.