Maharashtra

सुरक्षा काढून काही होणार नाही, लोकांचे प्रेम,आपुलकी हे साहेबांच सुरक्षाकवच

By PCB Author

January 24, 2020

मुंबई, दि,२४ (पीसीबी) – याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. शरद पवार यांची सुरक्षा व्यवस्था काढून काही होणार नाही. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला हा महाराष्ट्रचा इतिहास आहे. लोकांचे प्रेम, आपुलकी आणि आपलेपणा हे साहेबांच सुरक्षाकवच आहे. सुरक्षा व्यवस्था काढली बरे झाले, आज महाराष्ट्राला समजले भाजप किती खोट्या मनोवृत्तीचे आहेत ते. असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.