Notifications

सुब्रमण्यम स्वामींच्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी मालदीवचे भारत सरकारला समन्स

By PCB Author

August 28, 2018

नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मालदीव  देशाविषयी केलेल्या एका ट्विटवर मालदीवने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  मालदीव सरकारने भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांना  समन्स पाठवले  आहे. यात स्वामींचे हे ट्विट चिंताजनक आणि आश्चर्यचकित करणारे आहे, असे मालदीवने म्हटले आहे.  बोलभांड  सुब्रमण्यम स्वामी यांच्या एका ट्विटमुळे केंद्र सरकारची डोकेदुखी झाली आहे.