नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – देशाच्या सर्वोच्च तपास यंत्रणेतील सध्याची परिस्थिती विचित्र आणि दुर्दैवी आहे. याची चौकशी करण्याचे अधिकार सरकारकडे नाहीत. केवळ केंद्रीय दक्षता आयोग या प्रकरणाची चौकशी करी शकते, त्यामुळे त्याच्या सल्ल्यानुसार एसआयटी योग्यपणे चौकशी करेल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (बुधवार) येथे पत्रकार परिषदेत दिली.