Desh

सिडनीत मालिका विजय मिळवणारच- विराट कोहली

By PCB Author

December 30, 2018

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १३७ धावांनी धुव्वा उडवल्याने भारतीय संघात उत्साह संचारला आहे. या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीनेही मालिका विजयाचा आपला इरादा स्पष्ट केलाय. ‘आम्ही आता थांबणार नाही. सिडनीतील चौथी आणि अखेरची कसोटीही आम्हीच जिंकणारच, असे विराटने म्हटले आहे.

मेलबर्न कसोटीतील भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीचं कोहलीने कौतुक केले. खास करून सामनावीर जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा आणि करिअरमधील पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या मयांक अग्रवाल यांची कोहलीने प्रशंसा केली. ‘मेलबर्नमधील विजयाने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे सिडनीतील चौथ्या कसोटीत आम्ही सकारात्मक विचारांनी मैदानात उतरू. या चौथ्या सामन्यासह मालिकाही आम्हाला जिंकायची आहे’, असे विराटने सांगितले. ‘या दौऱ्यात विजय मिळवलेल्या दोन कसोटी सामन्यात आम्ही दमदार कामगिरी केली आहे. यामुळे आम्ही बॉर्डर- गावसकर चषक सुरक्षित ठेवू शकलो. मात्र, लक्ष्य अजून पूर्ण झालेले नाही’, असे विराटने स्पष्ट केले.