“सारे मोदी चोर”; बिहारच्या सुशील मोदींचा राहुलवर मानहानीचा दावा

0
701

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – बिहारचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘सारे मोदी चोर हैं’ या वक्तव्याच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. राहुल गांधी यांच्यावर आपण मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे सुशील मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते.

बिहारचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘सारे मोदी चोर हैं’ या वक्तव्याच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. राहुल गांधी यांच्यावर आपण मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे सुशील मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राहुल यांच्या या वक्तव्यासंदर्भात राहुल यांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले होते.

राहुल गांधी यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे ज्यांची आडनावे मोदी आहेत त्या सर्वांनाच ‘चोर’ असे संबोधले गेले आहे. या वक्तव्यामुळे समाजातील मोदी नावाच्या व्यक्तींची प्रतिमा मलीन झाली असल्याचे सुशील मोदी यांचे म्हणणे आहे. हे गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य असून याची शिक्षा राहुल गांधींना मिळायला हवी, अशी मागणी मोदी यांनी केली आहे.

एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधताना हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. सर्वच चोरांची आडनावे ‘मोदी’ का आहेत, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला होता. यावेळी नीरव मोदी आणि ललित मोदी यांचा उल्लेख राहुल यांनी केला होता.