नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – बिहारचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘सारे मोदी चोर हैं’ या वक्तव्याच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. राहुल गांधी यांच्यावर आपण मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे सुशील मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते.