सामान्य माणसाचा आवाज म्हणून शिवसेना सत्तेत – उद्धव ठाकरे

0
649

औरंगाबाद, दि. २२ (पीसीबी) – शिवसेनेचा जन्मच शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच झाला आहे. सत्तेमध्ये असून शिवसेना विरोधकांसारखी वागते, अशी टीका आमच्यावर केली जाते. आम्ही सत्तेमध्ये जरूर मात्र आम्ही सामान्य माणसाचा आवाज म्हणून शिवसेना सत्तेत आहे, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आज (शनिवार) औरंगाबादच्या लासूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आमच्यात आणि आघाडीमध्ये फरक काय राहिला?  शेतकऱ्यांना नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. गरज पडल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाईन. शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.