नवी मुंबई, दि. १५ (पीसीबी) – सातारा मतदारसंघात २३ मे रोजी मतदान झाल्यानंतर पुन्हा २९ तारखेला नवी मुंबईत मतदान करण्याचा अजब सल्ला भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे. मतदारांना दोन वेळा मतदान करण्याचा सल्ला दिल्याने मंदा म्हात्रे अडचणीत सापडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.