Maharashtra

साईबाबांच्या जन्मस्थानावरून कोणताच वाद मुख्यमंत्र्यांनी निर्माण केला नाही.पाथरी आणि शिर्डीकरांनीही तो करू नये

By PCB Author

January 21, 2020

मुंबई, दि.२१ (पीसीबी) -संत साईबाबांच्या जन्मस्थानावरून कोणताही वाद मुख्यमंत्र्यांनी निर्माण केला नाही. पाथरी आणि शिर्डीकरांनीही तो करू नये. संतांचे तेज अशाने कमी होईल. जन्मस्थानाच्या वादाचे गालबोट त्याला लागू नये .या वादासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने लक्ष घातले, शासनाची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही बाजूंचे त्यामुळे समाधान झाले आणि एक विनाकारण उद्भवणारा वाद लगेच शमला. शेवटी साईबाबांचे अवतारकार्य, त्यांनी दिलेली शिकवण महत्त्वाची, असे म्हणत सामना’तून म्हटले आहे.