पुणे, दि. २२ (पीसीबी) – राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेने युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आणले आहे. सल्लागाराच्या भरवशावर शिवसेना राजकारण करीत आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पुण्यात झाली. त्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मुंबईतील शिवसैनिकांना पीकविम्यातून काय मिळते, हेही ठाऊक नसेल; पण त्यांनी मोर्चा काढला, अशी टीका करून पाटील यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी होते. मात्र, त्याचा अहवाल दिला जात नाही. तरुणांना रोजगार देण्याच्या नावाखाली पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी तरुणांची फसवणूक केली आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना मते दिली आहेत. विधानसभा निवडणुकीत तसे होणार नाही, असे पाटील म्हणाले.