सर्व दिवे विझवल्यामुळे करोनाला वाटेल आता भारतात कोणीच नाही. त्यामुळे तो भारत सोडून निघून जाईल – एजाज खान

0
378

 

मुंबई, दि.४ (पीसीबी) – कोरोनाग्रस्त बांधवांना प्रकाशाच्या वाटेवर न्यायचं आहे. या रविवारी प्रकाशाची ताकद दाखवायची आहे. रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता मला तुमचे ९ मिनिट द्या, घरातील सर्व दिवे बंद करा आणि बाल्कनीत उभे राहून ९ मिनिट मेणबत्ती, मोबाईल टॉर्च लावा”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे.

याचाच धागा धरत अभिनेता एजाज खानने लक्ष्यवेधी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट एजाजने म्हंटले आहे की, ‘मोदीजी आपल्याला बिग बॉस खेळवत आहेत. आठवड्यातून एकदा येतात आणि नवा टास्क देऊन जातात’.

‘सर्व दिवे विझवल्यामुळे करोनाला वाटेल आता भारतात कोणीच नाही. त्यामुळे तो भारत सोडून निघून जाईल. धन्यवाद मोदी जी.” अशा आशयाचे ट्विट एजाज खानने केले आहे. एजाजने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.