Maharashtra

सर्व घुसखोरांना २०२४ पर्यंत देशाच्या बाहेर काढणार – अमित शहा

By PCB Author

December 03, 2019

रांची,दि.३(पीसीबी) – २०२४ पर्यंत देशातील सर्व घुसखोरांना देशाच्या बाहेर काढलं जाईल, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते झारखंड येथील चक्रधरपूर आणि बहारगोडा येथे झालेल्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते.

२०२४ पर्यत देशात एनआरसी लागू करण्याची मर्यादा आखून देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांपर्यत देशातील घुसखोरांना देशाच्या बाहेर काढलं जाईल, असं मोठं वक्तव्य अमित शहा यांनी सभेत बोलताना केलं आहे.

२०२४ पर्यंत घुसखोरांची ओळख पटेल. त्यांनतर त्यांना बाहेर काढण्यात येईल. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात, त्यांना बाहेर काढू नका. ते काय खातील? कुठे जातील? पण देशाच्या हितसंबंधाशी तडजोड केली जाणार नाही, असंही शहा यांनी म्हटलं आहे.