Maharashtra

सरसकट कर्जमाफीसाठी तब्बल ५० हजार शेतकऱ्यांचे राज्यपालांना पत्र

By PCB Author

February 25, 2020

कोल्हापूर, दि.२५ (पीसीबी) – भाजपाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात बारा कोरा व्हावा, या मागणीसाठी थेट राज्यपालांना पत्र लिहिण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सात बारा कोरा करावा, या मागणीसाठी कोल्हापूरमधील ५० हजार शेतकऱ्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे.

ही पत्रे घेऊन समरजीतराजे घाटगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे काहींनी तर स्वत:च्या रक्ताने आपली व्यथा मांडली आहे.ही पत्र आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत.

शेतकरी कर्जमाफी आंदोलनास प्रसार माध्यम व वृत्तपत्रांचा सकारात्मक हातभार!

राज्य शासनाने शेतकऱ्यांना जाहीर केलेली विनाशर्त कर्जमाफी प्रत्यक्ष मिळावी व सातबारा कोरा करून मिळावा यासाठी सुरू असलेल्या माझ्या प्रयत्नांची दखल घेत प्रसारमाध्यमांनी व वृत्तपत्रांनी हे आंदोलन व्यापक करण्यास सकारात्मक हातभार लावला आहे. आपणा सर्वांच्या साथीने सुरू केलेला हा लढा निश्चितच यशस्वी ठरेल अशी खात्री वाटते.#शेतकरी_आंदोलन

Gepostet von Raje Samarjeetsinh Ghatge am Montag, 24. Februar 2020