सरकार राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मीरच्या लोकांचा आवाज दाबत आहे – प्रियांका गांधी

0
397

दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – सरकार राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मीरच्या लोकांचा आवाज दाबत आहे. यापेक्षा जास्त राजकीय आणि राष्ट्रविरोधी काही नसू शकते. सरकार स्वतः जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून राजकारण करत आहे आणि आरोप मात्र विरोधकांवर लावत आहे, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी काश्मिर प्रश्नावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अखेर कधीपर्यंत असेच सुरू राहणार? काश्मीरमध्ये राष्ट्रवादाच्या नावाखाली लाखो लोकांचा आवाज दाबला जात आहे. काश्मीरमधील सर्व लोकशाही हक्कांवर गदा आणली जात आहे. यापेक्षा अधिक राजकीय आणि राष्ट्रविरोधी काहीच नसू शकते, असे एका ट्विटर युजरच्या ट्विटला री-ट्विट करताना प्रियांकांनी म्हटले आहे. काश्मिरमध्ये जे काही होतय त्याच्याविरोधात आवाज उठवणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि आम्ही हे करण्यापासून थांबणार नाही, असे प्रियांकांनी म्हटले आहे.