सरकार भाजपचेच बनेल आणि ते ५ वर्ष टिकेल – चंद्रकांत पाटील

0
604

मुंबई,दि.१६(पीसीबी)-भाजपशिवाय सरकार स्थापन करणं अशक्य आहे. तसेेच महाराष्ट्रात भाजपचं सरकार बनेल आणि ते ५ वर्ष टिकेल, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यातल्या मतांची एकूण टक्केवारी पाहता भाजपला जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. दुसऱ्या पक्षातून पक्षांतर करून भाजपत आलेल्या २६ जणांपैकी १६ जण विजयी झाले आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

भाजपकडे १०५ आमदार आहेत. तर १४ अपक्ष आमदारांची आम्हाला साथ आहे. त्यामुळे भाजपशिवाय राज्यात सरकार स्थापन करणं अशक्य आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी भाजपच्या २ बैठका पार पडल्या त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला.