Notifications

सरकार पैसे नसताना योजना काढून लोकांचा जीव घेते; राज ठाकरेंचा निशाणा   

By PCB Author

October 25, 2018

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – राज्य सरकार पैसे नसताना अशा योजना काढते. आणि लोकांचे जीव धोक्यात घालतात, अशा शब्दात मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला जाताना बुधवारी  स्पीड बोटला अपघात झाला. या अपघातात एकजण ठार झाला आहे. यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.