Maharashtra

सरकारच्या दुष्टीने पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!

By PCB Author

September 23, 2020

मुंबई,दि.२३(पीसीबी) – सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे! असं म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट पोस्ट केली आहे.

मुंबई व उपनगरांत मंगळवारी संध्याकाळपासूनच जोर धरल्यानं अनेक सखल भागात पाणी साचले आहे. गेल्या २४ तासांत मुंबई पुन्हा तुंबली आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबईकर हो, सरकारच्या दृष्टीनं मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचा पावसाळा? शांतता राखा, अशी टीका त्यांनी केली आहे.

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह अनेक भागांत पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केलंय. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत, असा आरोप त्यांनी केला आहे.