Maharashtra

सरकारकडून फायदा मिळवण्यासाठी पक्ष सोडणाऱ्यांना रोखू शकत नाही – अजित पवार

By PCB Author

August 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – काही आठवड्यावर विधानसभा निवडणुकै आल्या असताना काँग्रेस राष्ट्रवादी मधले निष्ठावान कार्यकर्ते नेते भाजप शिवसेनेंच्या वाटेवर आहेत. आज सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रावादी कॉंग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेना प्रवेश केला आहे, तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खा. सुनील तटकरे हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीला असणाऱ्या नेत्यांबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी, तसेच सरकारकडून काही फायदा मिळवण्यासाठी अनेकजण पक्ष सोडत आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष सोडणाऱ्यांना रोखू शकत नाही, असे पवार यांनी म्हंटले आहे. यवतमाळ येथे आयोजित सभेत ते बोलत होते.