नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – समाजमाध्यमांतून जाणीवपूर्वक फेक न्यूज पसरवण्याचे प्रकार वाढले आहेत. समाजमाध्यमांतून सातत्याने पसरविल्या जात असलेल्या फेक न्यूजचा प्रसार आणि अन्य बदनामीकारक मोहिमांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला, तर त्यांच्या भारतातील प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस उच्च सरकारी समितीने केली आहे.