मुंबई, दि. १२ (पीसीबी) – देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर सनातन संस्थेच्या लोकांकडून घाला घातला जात आहे. धर्माचे ध्रुवीकरण करण्याचा त्यांचा डाव आहे. अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे, त्यामुळे सनातन संस्थेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.