Maharashtra

सध्या तरी ठाकरे सरकार स्थिर आहे परंतू सरकारमधील नेत्यांची मने अस्थिर आहेत – सुधीर मुनगंटीवार

By PCB Author

May 26, 2020

मुंबई, दि.२६(पीसीबी) – सध्या तरी ठाकरे सरकार स्थिर आहे परंतू सरकारमधील नेत्यांची मने अस्थिर आहेत, असं म्हणत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकार मधील नेत्यांना मिश्किल टोला लगावला आहे.

तसेच महाराष्ट्रातलं राष्ट्रपती राजवट लागू करणं हे भाजपचं मत नसल्याचं सांगत ते वैयक्तिक नारायण राणेंचं मत आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. कोरोनामुळे शेतकरी, शेतमजूर, तरूण आज प्रचंड अडचणीत आला आहे. त्यामुळे त्याच्यावर आज मोठं आर्थिक संकट आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सरकारला एक विशेष पॅकेज जाहीर करायला काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी विचारला.

दरम्यान कोरोनामुळे शेतकरी, शेतमजूर, तरूण आज प्रचंड अडचणीत आला आहे. त्यामुळे त्याच्यावर आज मोठं आर्थिक संकट आहे. अशा परिस्थितीत ठाकरे सरकारला एक विशेष पॅकेज जाहीर करायला काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी विचारला.