सदाभाऊ खोतांचे मडकं कच्चच राहिले, यापुढे मडकी पारखून घेणार – राजू शेट्टी  

0
390

औरंगाबाद, दि. १३ (पीसीबी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करताना आम्ही सगळ्या मडक्‍यांना सारखाच आकार दिला होता, पण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे मडके कच्चे निघाले, यापुढे मडकी पारखून घेणार,  असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. 

राजू शेट्टी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. एखादा कुंभार जेव्हा माठ, मडक तयार करण्यासाठी माती घेतो, त्याला आकार देतो आणि भट्टीत टाकतो, तेव्हा त्यातील काही मडकी, माठ कच्ची निघतात, गळकी निघतात. सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत असेच काहीसे झाले आहे, असे शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाली. तेव्हा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता निवडून , पारखून घेतला होता. पण जसे मडकं घडवताना कुंभार एकच माती, साचा वापरतो आणि तरी एखाद मडकं कच्चं राहत, आणि गळत. तसाच काहीसा प्रकार सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत घडला. त्यांच मडकं कच्चंच राहिलं, असा टोला शेट्टी यांनी लगावला.