Notifications

सत्ता गेल्याने काँग्रेस सैरभैर झाली आहे – पंतप्रधान मोदी  

By PCB Author

September 25, 2018

भोपाळ, दि. २५ (पीसीबी) – काँग्रेस पक्ष सत्ता गेल्याने सैरभैर झाला  असून संतुलन बिघडले आहे. काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे विकासावर चर्चा करण्याऐवजी हा पक्ष आरोपांची चिखलफेक करण्यात धन्यता मानत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) येथे केली.

भोपाळमध्ये भाजपचा मेळावा आयोजित केला होता.यावेळी पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर तोफ डागली.