Maharashtra

सत्ता गेली तरी चालेल पण सावरकरांना भारतरत्न देण्यास आमचा विरोध कायम – विजय वडेट्टीवार

By PCB Author

January 20, 2020

नागपूर,दि.२०(पीसीबी) – सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध कायम आहे मग सत्ता गेली तरी चालेल, अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. सावरकरांबाबतची भूमिका संजय राऊतांना लखलाभ, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना नेतेे संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना समज द्यावी, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

भविष्यात संजय राऊतांनी बोलताना काळजी घ्यावी. संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत येत्या काळात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.