सत्ता गमवल्याच्या झटक्यातून फडणवीस आणखी बाहेर आले नाहीत – विजय वडेट्टीवार

0
353

चंद्रपूर,दि.१७(पीसीबी) – निवडणुकीत फडणवीसांना लोकांनी जागा दाखवली आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन बहुमत मिळवलं आणि सरकार स्थापन केलं. त्यामुळं त्यांना सत्ता गमल्याचा शॉक बसला आहे. या धक्क्यातून ते आणखी सावरले नाहीत. यासाठी वेळ लागेल, अशी टीका मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

हिंमत असेल तर जनादेश तपासा आणि पुन्ह निवडणूक लावा, असं थेट आव्हान फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिलं होतं. नवी मुंबईमध्ये भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या २ दिवसीय अधिवेशामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याला विजय वडेट्टीवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

निवडणूक ५ वर्षांसाठी असते. फडणवीस म्हणतील तेव्हा निवडणुका होतील? सत्ता गेल्यामुळे ते विसरभोळे झाले आहेत. पूर्णपणे भांबावून गेले आहेत. लोकांनी त्यांचं तेल काढलं. आता त्यांनी पुढच्या निवडणुकीची तयारी करावी आणि तेलमालिश करुन यावं, असा खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.