सगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे? – शिवसेनेचा भाजपावर नेम

0
866

मुंबई, दि. १० (पीसीबी) – निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची पद्धत आहे. सरकारच्या या जुमलेबाजीविरोधात आधी शेतकऱ्यांनी आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांनी बंड केले. हे लोकप्रियतेचे लक्षण आहे का, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. सगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे? हासुद्धा शंकेचा विषय असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.