नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे उमेदवार बी. के. हरीप्रसाद यांच्या नावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्षेपार्ह आणि उपरोधिक टिप्पणी केली होती. मात्र, ही टिप्पणी राज्यसभेच्या कामकाजातून वगळण्यात आल्याने मोदींच्या वर नामुष्की ओढवली. संसदेच्या इतिहासात देशाच्या पंतप्रधानांची टिप्पणी कामकाजातून वगळण्याचा हा पहिलाच प्रकार घडला आहे.