नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) ४७ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करताना देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जन्माष्टमी आणि शिक्षक दिनाच्याही त्यांनी शुभेच्छा दिल्या. भीषण पूरपरिस्थितीचा सामना करणाऱ्या केरळचा उल्लेख करताना मोदींनी बचाव कार्यात मदत करणाऱ्या नौदल, एनडीआरएफ आदी सर्व जवानांचे कौतुक केले. संपूर्ण देश केरळच्या पाठीशी उभा आहे, असे ते म्हणाले.