संपूर्ण जगाने मिळून पाच वर्षे चीनवर संपूर्ण बहिष्कार टाकायला हवा – भिडे

0
671

 

सातारा, दि.३१ (पीसीबी) – सर्व जगाने मिळून पुढील पाच वर्षे चीनवर संपूर्ण बहिष्कार टाकायला हवा, असे मत ‘श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

चीनमुळे करोनासारख्या मानव जातीला धोक्यात आणणाऱ्या साथीचा सर्व जगभर फैलाव झाल्याने त्यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात यायला हवा. असेही यावेळी बोलताना म्हणाले,

भिडे पुढे बोलताना म्हणाले,चीनमध्ये या विषाणूचा आणि साथीचा जन्म झाला. त्यांना या साथीचे गांभीर्य कळलेले असतानाही त्यांनी जगापासून ही गोष्ट दडवून ठेवलेली दिसते आहे. त्यांच्या या कृत्यामुळे आज सगळी मानवजात धोक्यात आली आहे. चीनच्या या बेजबाबदार कृत्यासाठी त्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा दाखल करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान ‘होम क्वारंटाइन’चा आदेश दिलेला असतानाही तो धुडकावत अन्य समाजाला धोका उत्पन्न करणाऱ्या इस्लामपूरमधील संबंधितांविरुद्धही कारवाईची मागणी भिडे गुरुजी यांनी केली आहे.

या विषाणूचा संसर्ग होण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येकाने गाईच्या तुपाचा वापर करावा असेही त्यांनी सुचवले. विषाणूचा संसर्ग नाकाद्वारे होत असून दर तीनचार तासांनी नाकामध्ये गाईच्या तुपाचे बोट लावले तर या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होईल असे ते म्हणाले.या राष्ट्रीय संकटाचा मुकाबला करण्यासाठी ‘श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे सर्व धारकरी प्रशासनास सर्व प्रकारचे सहकार्य करतील. तसेच पुणे विभागीय आयुक्त यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील धारकरी आवश्यक तेथे रक्तदान करतील, असेही त्यांनी सांगितले.