‘संधीसाधू पक्ष सोडून गेले, मात्र काँग्रेसला काही फरक पडणार नाही’

0
466

मुंबई, दि, १९ (पीसीबी) – काँग्रेस पक्षातून जे संधीसाधू लोक बाहेर पडले, व ज्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. अशा लोकांमुळे काँग्रेसला काहीही फरक पडणार नाही, असा अप्रत्यक्ष टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी भाजप नेते राधाकृष्ण विखेंना लगावला आहे. मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या समारंभात बोलत होते.

मुंबईमधील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित केलेल्या समारंभात बाळासाहेब थोरातांनी राधाकृष्ण विखेंवर टीका केली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर देखील निशाणा साधला आहे. काँग्रेसमुक्त महाराष्ट्राच्या बाता मारणाऱ्यांना स्वत:चे काय होणारे ते माहिती नाही. त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलू नये, असे म्हणत थोरातांनी चंद्रकांत पाटलांना लक्ष्य केले.