पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि.२५) आगमन होणार आहे. यादरम्यान वारकऱ्यांची मांदीयाळी राहणार असल्याने शहरातील वाहतुक सुरळीत रहावी, यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून गैरसोय टाळावी, असे आवाहन वाहतुक शाखेच्या पोलिसांनी केले आहे.