“संकटात राजकारण करणाऱ्या विरोधकांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही”

0
383

मुंबई, दि.२७(पीसीबी) – संकटात राजकारण करणाऱ्या विरोधकांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही, असं म्हणत प्रहार पक्षाचे नेते आणि मंत्री बच्चू कडू यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

कोरोनाच्या लढाईत ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे अशी तक्रार राज्यपालांकडे करत भाजपने राज्यभर आंदोलन केलं. तसंच देवेंद्र फडणवीस सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत आहे. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार समाचार घेतला आहे. संकटात राजकारण करणाऱ्या विरोधकांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी विरोधी पक्षाचा समाचार घेतला आहे. सत्तेत येण्याची स्वप्न पाहायची विरोधी पक्षाने सोडून द्यावीत, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.

दरम्यान सध्याच्या कठीण काळात विरोधकांकडून अशा प्रकारचं राजकारण अपेक्षित नाही. अशा वेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन कम करायला हवं आणि त्यातून देश आणि राज्याला बाहेर काढायला हवं, असं बच्चू कडू म्हणाले.