अकोला, दि. ३ (पीसीबी) – पुढच्या काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यात दंगली उसळतील, असा इशारा आमदार बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे. ते अकोल्यातील मुक्काम मोर्चातील भाषणात बोलत होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे देण्यासाठी उशीर करणाऱ्या प्रशासनाला आमदार बच्चू कडूंनी धारेवर धरले आहे.