शिवसैनिकांनी नुसत्या सतरंज्या उचलायच्या का? अजित पवारांचा उध्दव ठाकरेंना टोला

0
745

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – शिवसेनेने निष्ठावान शिवसैनिकांना डावलून जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिपद दिले. हा सामान्य शिवसैनिकांवर अन्याय आहे. त्यांनी किती काळ तुमच्या सतरंज्या उचलायच्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना पक्ष प्रमुख  उद्धव ठाकरे यांना आज (बुधवार) लगावला.

५ हजार  कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप मुख्यमंत्र्यांवर ज्यांनी केला. त्यांना मंत्रिमंडळात जागा दिली. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला, असे ते म्हणाले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण ही देण्यासाठी सांगितले होते, त्यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करायला हवे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

६ मंत्र्यांना  मंत्रिमंडळातून वगळण्यात आले, त्याचे कारण काय ? याचे कारण सभागृहाला कळायला हवे. या मंत्र्यांनी कामे केली नाही की, भ्रष्टाचार केला, की पक्षाला हवे तसे काम केले नाही, त्यामुळे यांना वगळण्यात आले का ? हे स्पष्ट करा, अशीही मागणी पवारांनी यावेळी केली.