शिवसेनेसोबत जायला काँग्रेस कचरतंय – नवाब मलिक

0
494

मुंबई,दि.१६(पीसीबी) – शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेच्या दिशेने पुढे जात आहे. मात्र शिवसेनेसोबत जायला काँग्रेस कचरत असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये बैठका आणि चर्चासत्र सुरु आहेत. मात्र, सरकार स्थापन करण्यास वेळ लागेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, महाशिवघाडीचे सरकार आणण्याच्या दिशेने प्रयत्न होत असले तरी या प्रक्रियेसाठी उशीर का होतोय?, असा प्रश्न नवाब मलिकांना विचारण्यात आला होता. यावर, काँग्रेस शिवसेेनेसोबत येण्यास साशंक आहे. मात्र, लवकरच चर्चा पूर्ण होऊन आम्ही सरकार स्थापन करु, असं नवाब मलिक म्हणाले आहेत