शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणामुळे कातेंवर जीवघेणा हल्ला; नवाब मलिक यांचा आरोप

0
357

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावरील हल्ल्यावरुन आता राजकारण तापू लागले आहे. कारण कातेंवरील हल्ला हा ठेकेदारीतून झाला असून त्यामागे शिवसेनेतले अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.