शिवसेनेचे नेते मंत्रिमंडळात झोपा काढतात का?

0
403

मुंबई, दि, २२ (पीसीबी) – शिवसेने प्रमुख उद्धव ठाकरे हे  स्वतः रस्त्यावर उतरून मुंबईमध्ये पीकविमा पीकविमा कंपन्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. यावर सर्वच स्तरातून टिका करण्यात येताना आपल्या पहायला मिळत आहे. पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या या पीकविमा मोर्चा संदर्भात बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

बच्चू कडू यांनी पुणे येथील कार्यक्रमात बोलताना ‘शिवसेनेचे नेते हे विमा कंपन्यांविरोधात मोर्चे काढत आहेत. पण सरकारमध्ये असताना ते शिवसेनेचे मंत्री झोपा काढतात का?’ असं म्हणत बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली केली. तसेच पुढे बोलताना राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच नुकसान झाले आहे मात्र अनेक दिवस झाले तरी सुद्धा पिकविम्याचे पैसे मिळाले नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार काहीही करताना दिसत नाही, असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले.