Notifications

शिवसेना सोबत आली तर ठीक, नाही तर आपण समर्थ आहोत – मुख्यमंत्री फडणवीस

By PCB Author

December 20, 2018

मुंबई, दि. २० (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना- भाजप युती होण्याची खात्री भाजपाध्यक्ष  अमित शहा यांनी व्यक्त केली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत परस्परविरोधी विधान केले आहे. शिवसेना सोबत आली तर ठीक, नाही तर आपण समर्थ आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी म्हटल्याचे सांगितले जात आहे.