Maharashtra

शिवसेना नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजपची लाचारी केली आता काँग्रेसची करतंय – संदीप देशपांडे

By PCB Author

December 15, 2019

मुंबई,दि.१५(पीसीबी) – विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल एक वक्तव्य केलं होतं. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेनं यावर आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी यावरुन मनसेने निशाणा साधला आहे.

शिवसेना नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजपची लाचारी केली आता काँग्रेस ची करतायत, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

जे माननीय बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ज्यांच्या पोटात आग आहे. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की लाचारीची श्रीखंड पुरी खायची की राजसाहेबांना साथ देऊन कष्टाची मीठ भाकर खायची, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.