शहिदांच्या नावे मतं मागणं म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार – शरद पवार

0
301

बारामती, दि. १७ (पीसीबी) – शहीद जवानांच्या नावे मतं मागणं, नवमतदारांना तसं आवाहन करणं म्हणजे टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्ताच राष्ट्रवाद का आठवला? असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला. दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे अशीही टीका पवार यांनी केली. तसेच नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्या संबंधांबाबत शंका वाटते असंही पवार यांनी म्हटलं आहे.