शरद पवार शपथविधी होईपर्यंत काय करतील सांगता येत नाही – बच्चू कडू

0
730

मुंबई,दि.२२(पीसीबी) – नव्या सरकारचे शपथविधी होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय करतील सांगता येत नाहीत. ते काहीही करु शकतात. कारण जे अजित पवारांना कळत नाही ते आम्हाला कसं कळणार, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची आमची इच्छा नव्हती. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका नेहमी संशयास्पद राहिली आहे. ते कधी काय करतील हे सांगता येत नाही. त्यामुळे भीती वाटते, असं ते म्हणाले आहेत.

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून पाठिंबा जाहीर केला होता. सध्या राज्यात सुरु असलेल्या घडामोडींबद्दल बच्चू कडू यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी पवारांच्या भूमिकेविषयी सांशकता व्यक्त केली आहे.