औरंगाबाद, दि. २५ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला महाआघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. त्याचबरोबर या दोन्ही पक्षातील राजकीय जवळीक वाढताना दिसून येत आहे. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, आज (गुरूवार) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद ते मुंबई असा विमान प्रवास केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.