Notifications

शरद पवार, राज ठाकरे एकत्र आले, तरी भाजपला फरक पडणार नाही – रावसाहेब दानवे

By PCB Author

October 26, 2018

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडी करून निवडणूक लढवली, तरी भाजपवर  कोणताही फरक पडत नाही. भाजप नशिबावर अवलंबून निवडणुका लढवत नाही. भाजप हा संघटनेच्या बळावर निवडणूक लढवतो. कोणी कोणाही सोबत गेले, तरी भाजपला काहीही फरक पडणार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.