शरद पवार असू द्या, नाहीतर त्यांचा बाप असू द्या, आम्ही घाबरत नाही – रामगिरी महाराज

0
4838

अहमदनगर, दि. २७ (पीसीबी) – रामायण आणि महाभारताबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुद्धी म्हातारपणी भरकटली आहे, अशी टीका सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केली आहे. जीवनात अनेक लोकांनी राजकारण केले असेल. मात्र, परमार्थामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या लोकांची तोंडे ठेचली पाहिजे. मग शरद पवार असू द्या नाही, तर त्यांचा बाप असू द्या. त्याला आम्ही घाबरत नाही, असेही ते म्हणाले.

पवार यांनी रामायण महाभारताबद्दल केलेले भाष्य म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. पवारांचे नाव घ्यायला तुम्हाला भीती वाटत असेल. जे त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांना राग येईल.  मला त्यांच्याशी काही घेणे देणे नाही. मला त्यांच्यासारखी मते मागायची नाहीत. मला त्यांच्या कार्यक्रमाची गरज नाही. मला बोलावले नाही तर बेटात बसून हरीहरी करू, असेही ते म्हणाले.

रामायण-महाभारताबद्दल भाष्य करून शरद पवारांनी मूर्खपणाचा कळस केला आहे. पवारांचे नाव घ्यायला तुम्हाला भीती वाटत असेल. जे त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांना राग येईल. मला त्यांच्याशी काही घेणेदेणे नाही, असेही ते म्हणाले.