Maharashtra

“शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन केले असते, तर अधिक बरे वाटले असते” भाजपा नेत्याचा टोला

By PCB Author

September 25, 2020

अहमदनगर,दि.२५(पीसीबी) – शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग आंदोलन केले असते, तर अधिक बरे वाटले असते असं म्हणत भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

“शरद पवार स्वतः कृषिमंत्री होते. त्यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते, शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेत्याने केवळ विरोधासाठी विरोध करणे सामान्य शेतकऱ्याला पटलेले नाही” असं तावडे म्हणाले आहेत.

दरम्यान या सरकारची नियत काय आहे, मराठा समाजाला कसे डावलायचे, हे या सरकारला माहित आहे. शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केले असते, तर अधिक बरे वाटले असते, असा टोला तावडेंनी लगावला.