शरद पवारांनी आधी काय केले, हे त्यांना माहित नाही का?; पक्षांतरांवर संजय राऊतांचा सवाल

0
567

मुंबई, दि. २९ (पीसीबी) –  जे आत्ता इतरांना नावे ठेवतात त्यांनी आधी काय केले, हे त्यांना माहित नाही का? बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी तयार झालेली माणसे राष्ट्रवादी काँग्रेसने फोडली, त्यावेळी शिवसेनेला काय वाटले असेल, असा विचार फोडणाऱ्यांनी केला होता का? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पक्षांतरासाठी दबाव टाकला जातो आहे, असा  आरोप  शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला होता. याबाबत विचारले असता   राऊत यांनी  पवार यांना प्रतिसवाल केला.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी तयार झालेली माणसे राष्ट्रवादी काँग्रेसने फोडली, त्यावेळी शिवसेनेला काय वाटले असेल, असा विचार फोडणाऱ्यांनी केला होता का? असा सवाल पवारांना केला. दरम्यान, विरोधी पक्ष टिकला पाहिजे, कारण विरोधकच उरले नाहीतर सत्ताधारी माजतील आणि लोकशाहीचे डबके होईल, असे होता कामा नये, असेही राऊत म्हणाले.