Maharashtra

शरद पवारांच्या राजकारणाचे युग समाप्त झाले- मुख्यमंत्री

By PCB Author

September 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – शरद पवारांच्या राजकारणाचे युग समाप्त झाले आहे. पिढी बदलली आहे. लोकांना तोडया-फोडण्याचे राजकारण आता आवडत नाही. नवी पिढी आमच्यासोबत का आहे? कारण त्यांना अभिप्रेत असलेली राजकीय भूमिका भाजपाकडून घेतली जाते म्हणून ते भाजपासोबत आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंडिया टुडे कॉनक्लेवमध्ये बोलताना म्हणाले.

तुम्ही साखर सम्राटांना भाजपामध्ये येण्यासाठी नोटीसचे भय दाखवता असा आरोप शरद पवार करतात. त्यावर फडणवीस यांनी शरद पवार असे राजकारण करायचे. त्यामुळे त्यांना तसे वाटते. शरद पवारांनी राजकारण करताना पक्ष बनवले, फोडले आता तेच त्यांच्यासोबत होत आहे तर ओरड कशाला करता?

शरद पवारांनी जे राजकारण केले तेच आता राष्ट्रवादीसोबत होत आहे असे फडणवीस म्हणाले. ४० वर्षात भ्रष्टाचाराचा आरोप नसलेले हे महाराष्ट्रातील पहिले सरकार आहे असे दावा फडणवीस यांनी केला.